Chanakya Niti : तुम्हाला श्रीमंत व्हायचंय? मग या तीन सवयी आजच सोडा
आर्य चाणक्य हे महान विचारवंत, अर्थशास्त्राज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला.

आर्य चाणक्य हे महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये आयुष्य जगताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत? याचं सार थोडक्यात मांडलं आहे. आदर्श पत्नी कशी असावी? आदर्श पतीचे लक्षणं काय असतात. आपला खरा मित्र कोणाला म्हणावं? शत्रू कसा ओळखावा? राजा कसा असावा? अशा अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मांडल्या आहेत.
चाणक्य म्हणतात अशा काही सवयी असतात, ज्या सवयी तुमच्या श्रीमंतीच्या मार्गात कायम अडथळा ठरतात. या सवयीमुळे तुमच्यावर मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. त्यामुळे अशा सवयींचा त्याग करण्यातच तुमचं भलं आहे. कोणत्या आहेत त्या सवयी? चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात.
आळस – आर्य चाणक्य म्हणतात आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जर तुम्ही आळशी असाल, कामामध्ये टाळाटाळ करत असाल तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. या जगात कष्टाला पर्याय नाही. तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केले तर तुम्हाला त्यातून अर्थप्राप्ती होईल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल.
राग – आर्य चाणक्य म्हणतात रागीट स्वभवाचा माणूस कोणालाही आपला शत्रूच वाटतो. त्यामुळे कोणतंही काम करत असताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करा. त्या कामात तुम्हाला यश नक्की मिळेल.
पैशांची बचत – आर्य चाणक्य म्हणतात जे लोक पैशांची उधळपट्टी करतात ते नंतर मोठ्या संकटात सापडतात. त्यामुळे आयुष्यात बचत महत्त्वाची आहे. तुम्ही जर आता बचत केली तर संकट काळामध्ये हाच पैसा तुमच्या उपयोगाला येणार आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.
What's Your Reaction?






